Thursday, August 19, 2010

सगळं होणार, सगळं होणार,

सगळं होणार, सगळं होणार, आता आपलं सरकार आलंय
सगळं होणार..... ।।

आता शेतमालाला बाजार मिळणार,

तुरडाळ १५० रु., तर साखर १०० रु. किलो होणार,
दलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार ।।

आता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत
१० वर्षांत जे करता आले नाही ते २ वर्षांत करणार,
दिवसभर वीज जाणार, रात्रीचीच काही तासच रहाणार ।।
रस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,
मतदारांचे मणके ढिले होणार,
ठेकेदारांचे मात्र खिसे भरणार ।।


इंग्रजी अंगणवाडीपासून,
आणि मायमराठी नष्ट होणार ।।



प्रज्ञासिंहला फाशी होणार, कसाब सरकारचा जावई होणार,

अतिरेक्यांना पेन्शन मिळणार
पोलीस मात्र नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडणार ll


आता अतिरेक्यांनाच मुंबईवर हल्ला करण्याचे परवाने देणार,
सामान्य किडामुंगीसारखी मरणार,
महाराष्ट्रासारख्या मोठ्या मोठ्या राज्यांत अशा छोट्या छोट्या गोष्टी नेहमीच घडणार ll

मराठी माणूस दिल्ली दरबारी स्वाभिमान गहाण टाकणार,
मुजरा करून सरदारक्या मिळवणार
अन् स्वाभिमानी शिवरायांना महाराष्ट्रापासून दूर सिंधू सागरात बसवणार ।।

आता दहावी नापास अकरावीत जाणार,
बारावी नापास डॉक्टर, इंजिनीअर होणार,
माणसं मारणार, पूल कोसळणार ।।


आता खून करणारे गृहमंत्री होणार,
हरणं मारणारे वनमंत्री होणार,
काहीच न करणारा मुख्यमंत्री होणार
सगळं होणार, सगळं होणार,
आता आपलं सरकार आलंय, सगळं होणार ।।

No comments:

Post a Comment